सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

काळात सांग काळात, काय ते झाले

’द बिग बॅंग थिअरी’ ही अतिशय गाजलेली आणि नुकतीच संपलेली विनोदी मालिका. यातील विज्ञानाचे चार पदवीधर अधून मधून तंत्रज्ञान वा विज्ञान याबाबत काही साधकबाधक, काही उद्बोधक चर्चा करत असतात. अशाच एक चर्चेदरम्यान कालप्रवासाच्या संदर्भात निर्माण झालेला हा भाषिक अथवा व्याकरणविषयक प्रश्न.

Howard: Something doesn't make sense. Look...

In 2015, Biff steals the sports almanac and takes the time machine back to 1955, to give it to his younger self. But as soon as he does that, he changes the future, so the 2015 he returns to would be a "different 2015", not the 2015 that Marty and Doc were in.

Leonard:
This is "Hot Tub Time Machine^" all over again. If future Biff goes back to 2015 right after he gives young Biff the almanac, he could get back to the 2015 with Marty and Doc in it. Because it wasn't until his 21st birthday that 1955 Biff placed his first bet.

Sheldon:
Wait. Whoa, whoa. Is “placed” right?

Leonard:
What do you mean?

Sheldon:
Is “placed” the right tense for something that would have happened in the future of a past that was affected by something from the future?

Leonard: (with little hesitation)
Had will have placed?

Sheldon:
That's my boy.

Leonard:
Okay, so, it wasn't until his 21st birthday that Biff had will have placed his first bet and made his millions. That's when he altered the timeline.

Sheldon:
Yeah, but he had will haven't placed it!

Howard:
What?!

Sheldon:
Unlike "Hot Tub Time Machine" this couldn't be more simple. When Biff gets the almanac in 1955, the alternate future he creates isn't the one in which Marty and Doc Brown ever use the time machine to travel to 2015. Therefore, in the new timeline, Marty and Doc never brought the time machine...

Leonard:
W-Wait...Is “brought” right?

Sheldon: (looks dumbfounded for a moment, and says hesitantly)
Marty and Doc never had have had brought...?

Leonard:
I don't know. You did it to me.

Sheldon:
Oh, I'm going with it. Marty and Doc never had have had brought the time machine to 2015. That means 2015 Biff could also not had have had brought the almanac to 1955 Biff. Therefore, the timeline in which 1955 Biff gets the almanac is also the timeline in which 1955 Biff 'never' gets the almanac...

And not just “never gets.”
never have,
never hasn't,
never had have hasn't.

Raj:
He's right*.

--------------------------------
^ A comedy film released in 2010, with a sequel in 2015.
*Remember, he is Indian! :)

कालप्रवास ही संकल्पना माणसाला नेहमीच मोहवत आलेली आहे. ’भूतकाळात केलेली एखादी चूक, घेतलेला निर्णय मागे जाऊन बदलून घेता आला तर काय बहार येईल’ असा विचार प्रत्येक व्यक्तिच्या मनात एकदा तरी तरळून जातोच. 

शास्त्रीयदृष्ट्या असा कालप्रवास शक्य आहे का यावर उहापोह चालू आहेच. तसे शक्य आहे म्हणणार्‍यांना ’शक्य नाही’ पार्टीचे लोक ’काळात मागे जाऊन तू तुझ्या आजोबाला लग्नापूर्वीच ठार मारलेस तर तुझा जन्मच कसा होईल?’ असा व्याघात (Paradox) समोर टाकून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करतात. मग 'शक्य आहे’ वाली मंडळी त्यांच्या कालसंकल्पनेच्या मर्यादा दाखवून देतात. 

’फ्युचुरामा’ सारखी एखादी चलच्चित्र मालिका ’तूच तुझा आजोबा असू शकतोस’ असा चावट पेचही उभा करते. थोडक्यात जोवर शक्य नि अशक्य या दोनपैकी एक वैज्ञानिकदृष्ट्या निर्णायकरित्या सिद्ध होत नाही तोवर माणसाच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव आहे.

विज्ञानकथा लिहिणार्‍या लेखकांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करुन यातून विविध शक्यता तपासल्या आहेत. प्रसिद्ध विज्ञानकथालेखक एच. जी. वेल्सची ’द टाईम मशीन’ ही अतिशय गाजलेली कादंबरी. चित्रपटांच्या क्षेत्रात ’बॅक टु द फ्युचर’ हे एक ठळक उदाहरण. 

अलिकडे नेटफ्लिक्स, अमेजन प्राईम यांच्यासारख्या ’हवे तेव्हा कार्यक्रम पाहा’ प्रकारातल्या इंटरनेट-बेस्ड वाहिन्या सुरु झाल्यापासून कालप्रवासाच्या कल्पनेवर आधारिक अनेक मालिकाही प्रसिद्ध झाल्या. नुकतीच संपलेली ’डार्क’ असेल किंवा त्यापूर्वीची ’लॉस्ट’ किंवा ’ट्वेल्व मंकीज’ असेल, सध्या गाजत असलेली ट्रॅव्हलर्स असेल... अशा काही उत्तम मालिका या संकल्पनेवर आधारित आहेत.

पण कालप्रवासाचा वेध माणूस नेहमीच घटनांच्या/घटितांच्या अथवा घटनाक्रमाच्या संदर्भात घेत आलेला आहे. काळात मागे अथवा पुढे जाऊन माणसाने केलेल्या बदलाचा वर्तमानावर अथवा एकुणच कालप्रवाहावर आणि त्या कालप्रवाहाचा भाग असलेल्या व्यक्ती, समाज अथवा व्यवस्था यांच्यावरील परिणाम हा या सर्वांचा गाभा असतो. 

कथानकाच्या कुळीचा (genre) विचार करता एकुणात इंग्रजी आणि विशेषत: हॉलिवूड चित्रपट हे त्यांच्या लाडक्या थ्रिलर प्रकाराची मांडणी अधिक करतात. क्वचित विनोदाच्या अंगानेही मांडतात. पण आज आपण जसे एखाद्या खासगी वा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनात बसून सहजपणॆ एका स्थानावरुन दुसर्‍या स्थानी सहजपणे ये-जा करतो तसे जर काळाबाबत होऊ लागले तर आपल्या संवाद भाषेवर काय परिणाम होईल असा विचार कोणत्याही लेखकाने आजवर केला नाही.

उदाहरणार्थ भविष्यात जाऊन आलेली एखादी व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी नि मूळ काळात परतून आली आणि आपल्या भविष्यातील अनुभवाबाबत बोलू लागली तर ते तिच्या दृष्टीने ’घडून गेलेले’ असल्याने भूतकालवाचक वाक्यरचना करेल, की ज्या काळाच्या तुकड्यामध्ये ती ते सांगते आहे त्याच्या संदर्भात अनुभवलेल्या घटनेचा काल भविष्यकाल आहे म्हणून भविष्यकालदर्शक वाक्यरचना करेल? तिढा असा की आपल्याकडे उपलब्ध असलेल्या व्याकरणातील भविष्यकाळाचा किंवा भूतकाळाच्या कोणत्याही प्रकाराचा (साधा, चालू, पूर्ण) आता लागू पडणार नाही.

’आजपासून दहा वर्षांनी मी पदवी परीक्षा पास झालो होतो.’ अशी काहीशी वाक्यरचना करावी लागेल. जी आजच्या व्याकरणाच्या नियमात बसणार नसली, तरी कदाचित कालप्रवास ही दैनंदिन घटना झाल्यानंतर व्याकरणाचे नियम वाढवून सामावून घेतली जाईल, आणि त्या समाजात सहज समजेलही.

- oOo -


हे वाचले का?

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

दाद द्या अन् शुद्ध व्हा

...आणि तो आला.

सार्‍या प्रेक्षागृहाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 'अरेच्या, हाच का तो?' असा प्रश्न मनात उमटतो. कारण 'तो' शिडशिडीत, अंगातून वीज सळसळत असावी तसा चपळ, डोक्यावर गोल हॅट, पार्श्वभागापर्यंत लो़ळत गेलेला बटलर कोट, आडमाप ढगळ पँट, डोळ्यात सदाहरित चौकस नि मिश्किल नजर आणि उजव्या हातात या सार्‍यांना आपल्या तालावर नाचवणारी एक ओल्ड मॅन्स स्टिक.

हा वृद्ध पण तरीही हातात काठी नाही, अंगाने भरलेला, नेमक्या मापाचे कपडे, बो-टाय... हाच काय तो? त्याला ती क्षणभराची शांतता देखील असह्य होते, आज वयामुळे शारीरिक हालचाली तर मंद झाल्या आहेत. इतक्यात ती मानेची चिरपरिचित हालचाल होते नि गर्दीची खात्री पटते.... अरे हाच की तो. क्षणार्धात सारे सभागृह हर्षातिरेकाने उठून उभे राहते. त्याला नकोशा वाटलेल्या शांततेला मागे सारून टाळ्यांचा कल्लोळ उसळलाय. सारं सभागृह उत्स्फूर्तपणे उभे राहिले आहे. अधेमध्ये 'ब्रावो ब्रावो'चा उद्घोषही ऐकू येतोय. सावकाश पावले टाकीत तो पोडियम जवळ येतो तरी तो टाळ्यांचा गजर कमी होत नाही... त्याला आता बोलायचंय्... पण तरीही लोकांचा उन्मेष निवळलेला नाही...

आज असं चित्र कुठे दिसतं? एखाद्याला सन्मान, पारितोषिक वा पुरस्कार जाहीर व्हायचा अवकाश, तो/ती त्याला लायक कशी नाही हे त्याच्या क्षेत्राताले वा त्याच्याबाहेरचे - मुख्यतः खासगी आयुष्याशी निगडित - निकषांच्या आधारे तो त्याला लायक कसा नव्हता, दुसरा कुणी कसा त्याहून लायक होता, निवडीत आपपरभाव कसा झाला वगैरे सांगणारे स्वयंघोषित विद्वान अहमहमिकेने तोंड आणि लेखणी - आणि हल्ली कॅमेराही - वाजवायला सुरुवात करतात. स्पर्धा सारं काही चांगलं पुढे आणेल म्हणतात. मग हे काय झालं आपलं?

हा असा आदर, ते अलोट प्रेम आज एखाद्याला का मिळत नाही? 'हल्ली तसं कुणी नाहीच मुळी' हा दोष समोरच्यावर ढकलण्याचा उद्योग सोपा आहे. पण आपलीच त्याच्याबद्दलची ओढ, आस कमी झाली का असा प्रश्न मात्र आपण विचारत नाही. एका आयुष्यात कुवतीपेक्षा नि उपलब्ध वेळेत जमू शकेल त्यापेक्षा अधिकाधिक साधू पाहताना त्यातल्या कुठल्याच गोष्टीबाबत आस उत्पन्न व्हावी, प्रेम उत्पन्न व्हावे इतका वेळ देणे शक्य होत नाही. पण दोष 'आपला' कधी असणं शक्यच नाही. तेव्हा दोष मग समोरच्याच्या गुणवत्तेचा.

गोष्ट इथेच थांबत नाही. काही सुदैवी व्यक्तींना लोकांचे असे प्रेम मिळतेही, पण मग आता आपल्याला ते खुपते. 'असे असूच शकत नाही. इतके सुंदर, इतके हवेहवेसे वाटणारे काही असूच शकत नाही.' असं म्हणत आपण आपली हत्यारे घेऊन धावतो. मग आमच्या सारख्याच चिंतातुर जंतूंना बरोबर घेऊन अभिजाततेचे नवे आयाम, नवे निकष आम्ही निर्माण करतो. त्याच्या आधारे लोकांच्या 'लाडक्या व्यक्तिमत्वाला' आम्ही खलनायक बनवतो, त्याच्या चेहर्‍यावरचा मुखवटा ओरबाडून काढण्याच्या गर्जना करतो, त्याने समाजाची अभिरुची बिघडवली वगैरे म्हणू लागतो (पण आपण 'घडवली' म्हणतो ती तरी नक्की कशाच्या जिवावर याचे उत्तर शोधत नाही, देत नाही.)

दुसरीकडे 'लोकांना हेच हवं' आहे म्हणून हीन-अभिरुचीच्या नव-नव्या पातळ्यांवर खाली घसरत जातो. बहुसंख्येप्रती टोकाची पराङ्मुखता नि टोकाचा अनुनय या दोन परस्परविरोधी प्रवाहात विचक्षणपणे दोन्हीचे भान ठेवतच आपल्या कलाकृती, आपले विचार निर्माण करणार्‍यांचा 'मध्यमवर्ग' लुप्त होत चालला आहे. सामाजिक आर्थिक प्रतलातही एकुण समाजातूनच हा मध्यमवर्ग विलुप्त होत चालला आहे. तो हळूहळू वरच्या नि खालच्या वर्गात वाटला जात विलीन होऊन जाईल. मग राहील ती फक्त 'आहे रे' नि 'नाही रे' वर्गाची रस्सीखेच.

स्पर्धेच्या तत्त्वाने जगात जे जे उत्तम तेच टिकेल असे म्हटले जाते. पण त्याला मिळालेले अलोट प्रेम बिनमहत्त्वाचे, नि सारी नैतिक-अनैतिक प्रचारमाध्यमे नि दबावतंत्र वापरून मिळवलेल्या 'बाहुल्या' महत्त्वाच्या, या टप्प्यापर्यंत आपण आलो आहोत. अनेकांना ही 'प्रगती' वाटते, वाटो बापडी.

हसता-हसवता डोळ्यात कधी पाणी ठेवून जाणार्‍या, कधी अंतर्मुख होण्यास भाग पाडणार्‍या, काळ्या-पांढर्‍या रंगातील चौकटींना रुपेरी किनार देऊ करणार्‍या जिवंत मनाच्या माणसाला कुर्निसात.

-oOo-


हे वाचले का?