-
जी.ए. कुलकर्णी यांचे कथाकार म्हणून स्थान अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर त्यांचे एकांडेपण नि एकारलेपण हे मराठी साहित्यप्रेमींच्या अवाजवी कुतूहलाचा विषय बनून राहिले आहे. त्यांचा तो काळा चष्मा, त्यांच्या न झालेल्या भेटीचे सुरस चमत्कारिक किस्से चवीने चघळणे हे कधी वैचित्र्यप्रेमापोटी, तर कधी छुप्या असूयेपोटी होत असते. इंग्रजीत ज्याला introvert किंवा अगदी self-centered म्हणता येईल– मराठीमध्ये आत्मसंतुष्ट नव्हे पण आत्ममग्न– असे हे व्यक्तिमत्व, विक्षिप्तपणाच्या कथांचे नायक बनलेले. याउलट सुनीताबाई देशपांडे या करकरीत बुद्धिवादी, लोकांच्या गराड्यात राहूनही त्या-त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार संवाद राखू शकणार्या, प्रसंगी कणखरपणे तो तोडण्यासही मागेपुढे न पाहणार्या. पुरुषप्रधान मानसिकतेच्या समाजात ‘पु.ल. देशपांडे यांची पत्नी’ हीच ओळख असलेल्या. कवि नि कवित… पुढे वाचा »
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...
Labels:
अरुणा ढेरे,
पुस्तक,
प्रस्तावना,
प्रिय जी. ए.
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
अंतरीच्या या सुरांनी
-
समोरच्या झाडातून बुलबुल साद घालू लागला म्हणून गॅस बारीक करून मी गॅलरीत आले. त्याचे गाणे चालूच होते. त्या सुराच्या दिशेने खूप शोधले, पण तो कुठेच दिसेना. हा त्याचा नेहमीचच खेळ आहे. आणि मीही वेडी दर वेळी अशी धावत येते, फसवली जाते आणि मग वैतागतेही. आज मात्र काय झाले कोण जाणे, न रागावता तिथेच डोळे मिटून स्वस्थ बसले. मग त्या गोड सुरांची, समोरच्या त्या झाडांची, झाडांमागल्या आकाशाची, त्यात बागडणाऱ्या ढगांची, त्यांतून कोसळणाऱ्या जलधारांची, त्यांना पोटाशी पेणाऱ्या माझ्या धामापूरच्या तलावाची, त्यातल्या इवलाल्या माशांची, तिथल्या त्या संरक्षक टेकड्यांची, त्यांच्या कुशीतल्या, माझ्या रक्ताशी नाते सांगणाऱ्या, लाल लाल पाऊलवाटांची– साऱ्या साऱ्या आसमंताची, पंचमहातत्त्वांची सावली त्या मिटल्या डोळ्यांतून अलगद आत उतरली. ती अंतर्बाह्य पांघरून मी निवान्त हलकी हल… पुढे वाचा »
मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४
गेले... ते दिन गेले
-
वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले गेले... ते दिन गेले... भ. श्री. पंडितांची ही कविता जेव्हा केव्हा ऐकते, तेव्हा तेव्हा गेल्या दिवसांविषयीची माणसाच्या मनातली हुरहूर किती सार्वत्रिक आहे, हे जाणवून मी नवल करीत राहते. अगदी लहान असताना रानात एकट्या पडलेल्या लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट मी ऐकली होती. एक लहानगा सुंदर पक्षी त्याला मित्र मिळाला आणि न पाहिलेल्या जगाविषयीची किती तरी अद्भुत गाणी न् गोष्टी लाकूडतोड्याचा मुलगा त्या पाखराकडून ऐकत राहिला. मग त्याला वाटलं की, या पाखराला कायमचंच जवळ का नये ठेवू? त्यानं एक सुरेख पिंजरा बनवला, पण पाखरानं तो पिंजरा पाहिला मात्र, ते जे उडून गेलं, ते परत कधीच त्या मुलाला भेटलं नाही. लहानपणी ऐकलेल्या त्या गोष्टीतली अद्भुतता आणि सुंदरता आता उरलेली नाही मनात; पण वाटतं की, आपण माणसंही पु… पुढे वाचा »
बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४
दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर
-
त्यांनी ‘ चिमुकलीच कविता ’ शिकवायला घेतली ती या वर्षातील शेवटचीच कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती. “यात एक ओळ फार झगझगीत आहे.” तातू हळूच म्हणाला. तो शेजारी बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता. कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे. कच्च्या पोवळ्यांच्या चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे (नखे लाखिया, दात मोतिया, आणि स्तनाकार पेले... यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता मोठी झाल्यानंतरची) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो, मग कसलीच चाहूल न दाखवता ती ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या … पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
माणसेः अरभाट आणि चिल्लर
बुधवार, १७ जुलै, २०२४
नकार : एक दैवी गुण
-
जो माणूस लिहितो, त्याने बोलावे; अशी अपेक्षा का बरे केली जाते? नुसती अपेक्षा नव्हे; तर आग्रह केला जातो, भीड घातली जाते, मध्यस्थ घातला जातो. आणि हे सगळे कशासाठी, तर व्याख्यान व्हावे म्हणून! आज एकाएकी मला जाणीव झाली आहे की, व्याख्यान देणे हा अत्यंत फालतू उद्योग आहे. मी सहसा व्याख्यान देण्यासाठी कुठे जात नाही. नम्रपणे नकार देतो. पण पुष्कळदा मित्रांच्या शब्दाखातर किंवा नातेवाइकांच्या आग्रहाखातर मला कुठे-कुठे ‘हो’ म्हणावे लागते. असे दोन होकार मी नुकतेच देऊन बसलो होतो आणि आपण हा काय मूर्खपणा केला, म्हणून आता पश्चात्ताप पावत होतो. मला गावोगावची फार निमंत्रणे येतात, असे मला म्हणावयाचे नाही; पश्चात्तापाचे ते कारण नाही. लोकप्रिय वक्ता म्हणून मला कोणी मोजत नाही. पण अधून-मधून कुणाच्या तरी भिडेला बळी पडून मी इंदापूर किंवा धामणगाव कॉलेजमध्ये जाऊन वा… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
पांढर्यावर काळे,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर
बुधवार, १० जुलै, २०२४
लेखकजिज्ञासायोग
-
(आज १० जुलै, गुरुनाथ आबाजीचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्याच्या कथालेखनाहून वेगळे, अनुभवनजन्य चिंतनशील लेखन असलेल्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मधील हा वेचा...) काही विचारायला तुझ्याकडे आता यायचे ते अगदी कोडगेपणानेच. ‘हे सारे जाणून घेण्याचे तुला प्रयोजन काय ? मी सर्वत्र आहे, हे तू जाण. तेवढे बस्स आहे.’ अशी एक टपली तू प्रत्यक्ष अर्जुनालाच मारली आहेस. तेव्हा तू काय मला पायरीवर पाऊल टाकू देणार ? तू सर्वहर, सगळ्यांचा मृत्यू आहेस, भविष्यकाळी उद्भव आहेस. हे सारे ठीक आहे. पण हे सारे आहे कशासाठी ? आधी सगळ्यांना जन्माला घालायचे, त्यांचे भोग त्यांना भोगू द्यायचे, आणि शेवटी ‘मी साऱ्यांना आधीच मारले आहे’, असे म्हणायचे. कुणी शरपंजरी पडलेले असल्यास त्यांस, शस्त्र खाली ठेवलेल्या वीरांस, ज्याच्य… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
माणसेः अरभाट आणि चिल्लर
शुक्रवार, ३१ मे, २०२४
आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु
-
मुकुंदराज गेल्या प्रकरणात आपण महाराष्ट्र आणि मराठी हे शब्द कसे आले ते पाहण्याचा प्रयत्न करून तो नाद सोडला. आता माणसे निमूटपणे बोलावयाचे सोडून लिहावयाला कशी लागली आणि त्यांच्यामागे असा कुठल्या संपादकाचा अगर प्रकाशकाचा तगादा लागला होता हे पाहावयाचे आहे. मुकुंदराजाचा 'विवेकसिंधु' हा पहिला मराठी ग्रंथ म्हणतात. पण ते चूक आहे. आता मुकुंदराज हा आद्य लेखक कसा? शक्यच नाही. उद्या वाटेल तो स्वतःला आद्य म्हणेल. शिवाय हाताशी पाचपन्नास ग्रंथ असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ होणे शक्य नाही. महाराष्ट्रात आधी खूप ग्रंथरचना होती. किंबहुना, आधी सगळे कोश, संदर्भग्रंथ वगैरे तयार करूनच दंडकारण्यातल्या राक्षस, यक्ष, वगैरे लोकांना मराठी शिकविले. काही दिवस मराठी ही त्यांची सेकंड लँग्वेज होती. राक्षसी, यक्षी वगैरे … पुढे वाचा »
Labels:
पु. ल. देशपांडे,
पुस्तक,
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास,
ललित
शनिवार, २५ मे, २०२४
छोटीशीच आहे फौज आपुली
-
मनुष्यप्राणी हा सर्वांत बुद्धिमान प्राणी हे तर खरेच. पण इतरही प्राण्यांना आपापल्या परीने कमीअधिक बुद्धी असतेच. स्वसंरक्षणासाठी तरी ते थोडीफार अक्कल वापरतातच. मत्स्यावतार हा आपण प्रथमावतार मानतो. माशांचेच उदाहरण घेतले तर पाण्याखालच्या साम्राज्यातला जगायचा पहिला हक्क हा माशांचा. पोटासाठी मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना माशांनी आजवर समजून घेतले. तो एक निसर्गक्रमच आहे म्हणा किंवा जीवसृष्टीचा तो नियम आहे म्हणा किंवा जीवनचक्र अखंडित राहण्यासाठी अत्यावश्यक अशी अट आहे म्हणा, मासे स्वतःही आपल्याहून छोटे मासे खातात, तेव्हा माणसानेही खाण्यासाठी मासे पागले तोवर माशांनीही समजूतदारपणा दाखवला. पण यंत्रयुगातला मानव जेव्हा वेगवेगळी स्फोटके, हत्यारे शोधून काढून पाण्याखालच्या साम्राज्यात घुसखोरी करून, कधी गंमत म्हणून तर कधी शिकार म्हणून, कधी भौतिक शोधातली आव… पुढे वाचा »
शुक्रवार, १७ मे, २०२४
वेचताना... : आज धारानृत्य चाले...
-
महानगरी आयुष्यात माणसाच्या दृष्टीने वैय्यक्तिक पातळीवर पावसाचे अप्रूप फारसे राहिले नसले, तरी अनागर आयुष्यामध्ये उन्हाळ्याची काहिली शमवणारा आणि सुगीची चाहूल देणारा पाऊस जीवनदायी नि हवासा वाटणारा. पावसाचे हे कवतिक मानवाप्रमाणेच मानवसदृश प्राण्यांमध्येही तितकेच असोशीने व्यक्त केले जाते याची प्रथम नोंद डॉ. जेन गुडाल या विदुषीने केली आहे. जेन गुडाल यांनी चिम्पान्झी या वानरकुलातील मानवाचा भाऊबंद मानल्या गेलेल्या प्राण्याच्या अभ्यासासाठी सारे आयुष्यच वेचले आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांच्या ‘ चित्रे आणि चरित्रे ’ या पुस्तकामध्ये ‘ साहसी संशोधक: जेन गुडाल ’ (१) या शीर्षकाखाली तिच्यावर एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये जेनने अनुभवलेल्या एका प्रसंगाचे वर्णन त्यांनी दिले आहे. (२) एके दिवशी… पुढे वाचा »
गुरुवार, ९ मे, २०२४
वेचताना... : जिज्ञासामूर्ती
-
‘एक ना धड भाराभार चिंध्या’ म्हणा किंवा ‘अनावर जिज्ञासा नि अशक्त चिकाटी’ म्हणा अशा वृत्तीने जगत असताना मला स्तिमित करणारे बरंच काही सापडत गेलं. रुजलं नाही तरी भावत गेलं. काही वर्षांपूर्वी पक्ष्यांबद्दल कुतूहल जागं झालेलं असताना एका निसर्गप्रशिक्षण शिबिराला उपस्थिती लावली होती. तिथे प्रायमेट्स म्हणजे वानरकुलातील प्राण्यांवरील व्याख्यानामध्ये जेन गुडाल या विदुषीचे नाव प्रथम ऐकले होते. मोजका काळ वगळता सारं आयुष्य चिंम्पान्झींच्या सहवासात व्यतीत करुन चिकाटीने त्या प्रजातीच्या जगण्याचे तिने दस्तऐवजीकरण केले होते. त्यातून मानवी जीवनप्रवासाच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात अनुभवसिद्धता, निरीक्षणक्षेत्रात मोठा वाटा उचलणार्या या स्त्रीने मला स्तिमित केले होते. पुढे तिच्यासह तसंच तिच्या अनुभवाच्या आधारे च… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)