RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

ऋणानुबंध


  • बेलार्दो कुटुंबाशी स्नेह दृढ होण्यास एक योगायोग (कारणीभूत) झाला. बेलार्दो कुटुंबात एकदा भोजनाचं निमंत्रण होतं. दिवस होता चार डिसेंबरचा. तो माझा वाढदिवस होता. त्या घरात मी पाऊल टाकलं तेव्हा कळलं त्या दिवशी मग्दालेना यांचाही वाढदिवस होता. योगायोग म्हणजे दिनांक आणि वर्षही एकच होतं. मग्दालेनाचा एकुलता एक भाऊ गेल्यामुळे त्या मला भाऊ मानीत होत्या. त्या छोट्या अ‍ॅनाला म्हणाल्या, "नॉई सियामो जेम्मेली ('आम्ही जुळी भावंडं आहोत.')". हे जुळ्या भावंडांचं कोडं अ‍ॅनाच्या काही लवकर ध्यानात आलं नाही. ती गोंधळून गेली. तिने विचारले, " फादर भारतातले व तू इकडची, मग तुम्ही जुळे कसे?" मग्दालेना खळखळून हसल्या. बर्थडेचा खास बेत होता. मला सुट्टी होती. अकरा-साडेअकराच्या सुमारास मी त्यांच… पुढे वाचा »

वेचताना... : ओॲसिसच्या शोधात


  • लेखनाच्या दर्जावरुन नव्हे तर लेखकाच्या ’आडनावा’वरून किंवा त्याच्या साहित्यबाह्य मतांवरून त्याच्या लेखनाला न वाचताच बाद करून टाकण्याची आपल्याकडे परंपरा आहे.  एवढं पुरेसं नाही म्हणून की काय वर आपापले गट असतात, इतर सार्‍या निकषांत बसत असला पण आपल्या गटातला नसला तर त्याच्या लेखनाची दखल न घेणे, त्यावर ताशेरे ओढणे हे ही चालते. नवे-जुने, देशीवादी-आधुनिक वगैरे कळप आपापली ’भूमी’ राखून असतात. त्यातच देशातील बहुसंख्येच्या बाहेरच्या सामाजिक गटातला लेखक असेल मग तर विचारायलाच नको. त्यामुळे ’फादर’ दिब्रिटोंचं ’ओॲसिसच्या शोधात’ वाचलंस का?’ या माझ्या प्रश्नावर ’आम्ही खूप वाचतो बरं का’ असा दावा करणारे बरेच जण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले होते. इतके सुरेख पुस्तक वाचून त्यातला आनंद घेता आला नाही, हे असल्या पूर्वग्रहदूषित मनाच्या व्यक्तींचे दुर्दै… पुढे वाचा »

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

विचारांच्या मूल्यमापनाची परिमाणे


  • हटवादीपणाने व आग्रहाने अमुकच एक सत्य आहे असे आपण कसे म्हणू शकू? नेहरुंना असे वाटे की, सर्व प्रश्नांवर आपण आपले मन खुले ठेवले पाहिजे. विचारांचा हा मोकळेपणा वैज्ञानिक दृष्टीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विविध प्रश्नांकडे ठोकळेबाजपणे पाहण्याची कम्युनिस्टांची पद्धत त्यांना चुकीची वाटे. साचेबंद विचार करुन आपण फक्तच चुकीचा विचार करतो, इतकेच नाही तर जनतेने योग्य मार्गाने विचार करावा, त्यांची विचारक्षमता वाढावी यालाही आपण अडथळे करतो. भारतीय कम्युनिस्टांविषयी तर त्यांच्या मनात विशेष राग होता. भारतासमोर कोणते प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवावे लागतील याबाबत कम्युनिस्टांना संपूर्णपणे अज्ञान आहे, असे नेहरुंना वाटे. भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या आधारे हिंदुस्थान समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. नेहरुंना असे वाटे की, भारतातील परिस… पुढे वाचा »

वेचताना... : पं. नेहरु: एक मागोवा


  • माणसाच्या बुद्धीचा विकास जसजसा झाला, तसतसे त्याची बाह्य धोक्यांची जाणीव वाढत गेली. मग त्याने धोक्यापासून रक्षण करु शकतील अशी भौतिक आणि अध्याहृत अशी दोन प्रकारची साधने त्याने विकसित केली. निसर्ग घटकांच्या दैवतीकरणाने सुरुवात करुन अखेर अमूर्त अशा देव संकल्पनेपर्यंत तो पोचला . स्वतःला सुरक्षित करुन घेण्यासाठी या बाह्य, अध्याहृत खुंट्यांचा आधार घेत असतानाच तो दुबळ्या जनावरांप्रमाणे कळपाने राहात होता. जनावरांहून अधिक प्रगल्भ जाणीवा, अपेक्षा नि प्रेरणा विकसित झाल्या, तसतसे त्याला कळपातील परस्पर-व्यवहारांना अधिक काटेकोर करण्याची गरज भासू लागली. त्यातून आचारी (behavioral) धर्माचा जन्म झाला, आणि कळपाचे रूपांतर समाजात झाले. परंतु समाज आणि व्यक्ती यांचे हितसंबंध अनेकदा परस्परांना छेदून जात असल्याने व्यक… पुढे वाचा »