-
आपल्या अभिमानाची स्थाने भूतकाळात शोधणार्या भारतासारख्या देशात, इतिहासाच्या आधारे केलेले लेखन हे साहित्य क्षेत्रात वाचकांतील लोकप्रियतेबाबत संख्यात्मक निकषावर वादातीतपणे पहिल्या क्रमांकावर आहे. याचा सुकाळ इतका वाढला आहे की हळूहळू इतिहासाच्या आधारे केलेले ललित लेखन आणि इतिहासावरचे लेखन यातील सीमारेषा पुसट होऊ लागल्या आहेत. एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीच्या चरित्राआधारे लिहिलेल्या कादंबर्यांची लाट तर आज तीस पस्तीस वर्षांनंतरही ओसरायचे नाव घेत नाही. आणि असे लेखन करणारे लेखकच काय पण नाटकासारख्या सादरीकरणात त्या त्या व्यक्तिरेखेला साकार करणारे नटही इतिहासाचे तज्ज्ञ म्हणून मिरवू लागले आहेत. त्यातच माध्यम उपलब्धतेचा स्फोट झाल्यावर तर त्यांच्याकडून इतिहासतज्ज्ञांना 'मागणी' वाढू लागली आहे. परिणाम… पुढे वाचा »
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
शनिवार, २८ जानेवारी, २०१७
वेचताना... : युगान्त
इतिहास-वेध
-
महाभारतीय समाज बर्याच अर्थांनी संकुचितच होता. त्याच्या जीवनाचे चित्र दाखवते की, आधिभौतिक दृष्टीने - द्रव्याच्या दृष्टीने - तो कृषि-गोरक्षकांचाच होता. वैदिक आर्य येथल्या लोकांत मिसळू लागले होते. पण त्यांचे सांस्कृतिक जीवन बहुतांशी गोरक्षक आर्यांच्याच मर्यादेत राहिले होते. घोडे हे त्यांचे आवडते जनावर. घोड्यांच्या संख्येवर, रूपावर व गुणांवर क्षत्रियांचा मोठेपणा अवलंबून असे. बर्याचशा राजांची नावेही घोड्याच्या मालकीची वा गुणांची निदर्शक होती. उदा. 'हर्यश्व' (तांबडा घोडा असलेला), 'अश्वपति' (घोड्यांचा स्वामी), 'श्वेतवाहन' (अर्जुनाचे एक नाव), 'युवनाश्व' (एका प्रसिद्ध पूर्वकालीन राजाचे नाव). सारथी असणे, रथातून लढणे (महारथी, रथी, अतिरथी) हा मोठेपणा समजला जाई. रथ लहान-मोठे असत. पण महाभारतकाली कोणाला घोड्यावर बसता ये… पुढे वाचा »
सोमवार, २३ जानेवारी, २०१७
वेचताना... : बाराला दहा कमी
-
'बाराला दहा कमी' हे मराठी भाषेतील एकमेवाद्वितीय पुस्तक आहे. एकतर आपल्याकडे शुद्ध विज्ञान विषयावर लिहिली गेलेली पुस्तके नगण्य, फार फार तर विज्ञानकथा लिहिल्या जातात. त्यातही विज्ञान चवीपुरते नि कथाच जास्त अशी परिस्थिती असते. अशा वेळी एखाद्या वैज्ञानिक संकल्पनेचा ऐतिहासिक, सामाजिक वेध घेणं त्याच्या राजकीय-सामाजिक इतिहासाचा अभ्यास करून त्याची 'बखर' मांडणं हे तर आपल्या तर्काच्या पलीकडचे म्हणावे लागेल. केवळ इथेच न थांबता त्याच्याशी निगडित व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात - संदर्भापुरते - डोकावून पाहात अनेक छोट्या छोट्या तपशीलांसह एक सारा कालपटच उभा करणं हे अशक्यप्राय वाटावं इतकं चिकाटीचं काम आहे. दुसर्या महायुद्धाने एक नवे जग निर्माण केले. हे विधान अनेक अर्थांनी घेता येईल. एका बा… पुढे वाचा »
रविवार, २२ जानेवारी, २०१७
विध्वंसाची निर्मिती
-
अण्वस्त्रप्रकल्पावर अमेरिकेच्या लष्करातून मुरब्बी अभियांत्रिक घेतले गेले. हाती घेतलेलं काम धडक पद्धतीनं तडीला नेणारे अशी त्यांची ख्याती होती. संपूर्ण अण्वस्त्रप्रकल्पाचा प्रमुख सूत्रधार ज. लेस्ली ग्रोव्हज् हा त्यांच्यातलाच होता. पहिल्याच भेटीनंतर अमेरिकन अध्यक्षाच्या शास्त्रीय सल्लागारानं सेक्रेटरी ऑफ स्टेटला कळवलं, "ग्रोव्हज्चं आणि माझं जे काही बोलणं झालं त्यावरून अशा कामाकरिता लागणारा पोच त्याच्या ठिकाणी कितपत आहे, याची मला शंकाच वाटते..." ग्रोव्हज्च्या मनातही वैज्ञानिकांविषयी अढी होतीच - सेनाधिकारी आणि अभियांत्रिक अशी वैज्ञानिकांची दोन सावत्र भावंडं त्याच्यात एकत्र झालेली होती ना! शिकागो इथल्या प्रयोगशाळेला त्यानं प्रथम भेट दिली तेव्हाची गोष्ट. मुळात त्याला तंत्रज्ञांच्या रो… पुढे वाचा »
Labels:
पद्मजा फाटक,
पुस्तक,
बाराला दहा कमी,
माधव नेरुरकर,
विज्ञान,
वेचित
गुरुवार, १२ जानेवारी, २०१७
वेचताना... : शुभ्र काही जीवघेणे
-
" ओंजळीत सूर्य घेऊन समुद्रभर हेलकावे खाणार्या चंद्रदेवतेची एक झुलू दंतकथा आहे. ही शापभ्रष्ट देवता लाटालाटांवर पिंगा घेत खलाशांची गाणी गाते अन् आपल्या गाण्याने आपणच बेचैन होते. चंद्रदेवतेचं गाणं हा समुद्राचा निनाद आहे असं म्हणतात. " --- ज्याला अभिजात किंवा शास्त्रीय संगीत असं सामान्यपणे म्हटलं जातं त्यात दिग्गज गायक-गायिकांनी पहिला 'सा' लावताच, किंवा पहिली सुरावट घेताच अनेक मुरलेल्या रसिकांकडून 'व्वा:' अशी दाद जाते. नवथर किंवा पुरेशा न मुरलेल्या रसिकाला कदाचित हा प्रकार फुकाचा शो-ऑफ वाटू शकतो. परंतु खरंच अनेकदा तो सूरच असा लागतो की पुढचं गाणं एकदम सजीव होऊन समोर उभे राहिल्याचा भास येतो. अनेकदा पुढचा राग-विस्तारही जेव्हा आपल्या मनात उमटलेल्या या चित्राशी सुसंगत होऊ ल… पुढे वाचा »
Labels:
वेचताना,
वेचित,
व्यक्तिचित्रे,
शुभ्र काही जीवघेणे,
संगीत
ठुमरीचा ’उठाव’
-
संगीतातल्या बामणांनी ठुमरीला नेहमीच वेशीबाहेर ठेवलं. खयाल गायकीला दरबारी शिरपेच मिळाला अन् ठुमरी चुपचाप गावकुसा बाहेर कोठ्यावर विराजमान झाली. ठुमरीचा अहिल्योद्धार तवायफांनी केला हे विशेष. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मोगलाई आमदनीचे ताणेबाणे उसवत गेले अन् कंपनी सरकारचा हुकूम सर्वत्र रुजू झाला. तो उत्तर हिंदुस्थानचा अत्यंत धकाधकीचा काळ होता. याच काळात ग़ज़ल-ठुमरी दादराचा डौल झळाळून निघाला. महमदशाह रंगीलेचा रसीला कित्ता होताच. त्यात मिर्झा गालिब, दाग़, मोमीन, ज़ौकने तर कहर केला. बहादुरशाह ज़फरने ग़ज़लच्याच दोन ओळीत त्या काळाचा आकांत शब्दबद्ध केला. तवायफांनी तो गाऊन अमर केला. ठुमरी, दादराच्या असंख्य चीजा कोठ्याकोठ्यावर झंकारत होत्या. 'छोटासा बालमुवा मोरा', 'नजर लागी राजा' सारख्या सुरेल… पुढे वाचा »
Labels:
अंबरीश मिश्र,
पुस्तक,
वेचित,
व्यक्तिचित्रे,
शुभ्र काही जीवघेणे
सोमवार, ९ जानेवारी, २०१७
वेचताना... : मितवा
-
या आधी विद्याधर पुंडलिकांच्या 'शाश्वताचे रंग' मधील वेचा दिला तो वाचक आणि लेखनाचे अनुबंध दर्शवणारा म्हणून. पुंडलिकांखेरीज अशाच प्रकारे अन्य लेखकांच्या लेखनाशी तद्रूप होणारे दुसरे लेखक म्हणजे जीए. पण या दोघांपलिकडे जाऊन थेट तादात्म्य पावताना त्या लेखनातून निर्माण झालेले जग, त्यातील पात्रे यांच्याशी समरस होणारा, जणू ते आपल्या जगण्याचा भाग असल्याचा समज करून घेणारा आणि आपले सारे लेखनच त्या जगात घेऊन जाणारा आणि म्हणून ते जग अपरिचित असलेल्यांकडून दुर्बोधतेचा शेरा मिळवणारा लेखक म्हणजे ग्रेस. ग्रेस यांची सर्वसाधारण ओळख कवी म्हणूनच आहे. त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे कोणत्याही परंपरेचा नसलेला आणि कदाचित कोणत्याही परंपरेचा उद्गाता नसलेला कवी. त्यांच्या कवितांमधील प्रतिमा, संदर्भ अनेकदा या भूमीशी … पुढे वाचा »
प्रतिमाविभ्रम आणि आरसा
-
आरशावर चिमण्या फार गोंधळ घालतात. सुचू देत नाहीत अजिबात. घटकाभर डोळा लागला तरी त्यांच्या धिंगाण्याने जाग येते. पुन्हा खाली जमिनीवर हा एवढा कचरा सांडून ठेवतात तो वेगळाच! मुलींनाही आरशाचे वेड फार. एकदाही इकडून तिकडे जाताना आरशात डोकावल्याशिवाय जाणार नाहीत. काही कारण नसताना. उगीचच! अभ्यास करायलाही आरशासमोर बसायलाच स्पर्धा. मी या चिमण्यांच्या अन् पोरींच्या अनावर छंदामुळे वैतागून आरशावर एक जाडसर कापडाचा पडदा बांधून टाकला. काम असले की तेवढ्यापुरता कपडा बाजूला करायचा. एरवी पडद्याने आरसा झाकून टाकायचा, असा नियम करून टाकला. मी जातीने आरशावर नजर ठेवू लागलो. जरा उघडा दिसला की आठवणीने उठून स्वतः पडदा टाकू लागलो. लहानपणापासून मला आरशाची चीड येते. त्याच्यामागे माणसे नादावू लागली की त्यांना खडबडून जागे कर… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)