-
“आपल्या आजच्या व्याख्यात्या श्री...... ह्यांच्या कन्या आहेत—” माझी ओळख करून देणाऱ्या बाईंच्या बोलण्याला सुरुवात झाली. त्यांचे बोलणे मी अर्धवट ऐकत होते; पण मन मात्र बाईच्या बोलण्याने जाग्या झालेल्या स्मृती आणि कल्पना ह्यांत गुंतले होते. “एकदा लग्न उरकून टाकले म्हणजे जबाबदारी सुटली” असे बाबांचे बोलणे मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासून ऐकले होते. माझा पुढे शिकण्याचा हट्ट, बाबांचा त्रागा, शेवटी “कर, काय वाटेल ते कर” ह्या शब्दांनी मोठ्या कष्टाने दिलेली परवानगी हे आठवले; व तीच भाषा, तेच भांडण आणि तोच शेवट दरवर्षी परीक्षेच्या शेवटी कसा व्हायचा हे आठवून क्षणभर हसू आले. ते रागात आले म्हणजे अस्सल प्राकृतात पाचपन्नास शिव्या हासडून बोलत. आम्ही जरा मोठी झाल्यावर तर रोज ह्या-नाही-त्या गोष्टीवरून वादविवाद व श… पुढे वाचा »
RamataramMarquee
अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
परिचय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
