RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, २९ मे, २०२६

... परतुनि ये घरा


  • प्रास्ताविक: ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकातील हे दोन प्रवेश कालिदासाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांभोवती रचलेले आहेत. ‘पाखरा जा, त्यजुनिया...’ या शीर्षकाच्या पहिल्या भागात प्रिय मल्लिकेला सोडून कालिदास कीर्ती, ऐश्वर्य, सत्ता यांच्या दिशेने चालला आहे. या भागात हे सारे गमावलेला कालिदास मल्लिकेकडे परतून आला आहे. दोन्ही भागांची शीर्षके मो. ग. रांगणेकर यांच्या ‘वहिनी’ या नाटकातील ‘पाखरा जा’ या पदातील अनुक्रमे पहिली नि अखेरची ओळ आहे. --- (परत वीज कोसळते, मेघगर्जना होते, देवडीकडील दार हळू हळू उघडते. दारात कालिदास उभा. खचलेला मोडलेला. मल्लिका एकदम उभी राहून तिकडे पाहू लागते. बाबरलेली. गोंधळलेली, तो पुढे येतो. मल्लिका अवाक् होऊन त्याच्याकडे पाहात राहाते.) कालिदास : बहुधा ओळखलं नसावंस. (मल्… पुढे वाचा »

शुक्रवार, २२ मे, २०२६

शुभास्ते पंथान: सन्तु


  • बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईला जात होतो. पहिल्या वर्गाचा तो डबा नेहमीप्रमाणेच भरलेला होता. आमच्या पुढच्याच दोन जागांवर दोन बाया येऊन बसल्या. त्यांच्या जवळच्या सामानात एक जरा वेगळीच चीज होती. पाळण्याचा मुलांना निजवायचा मधला भाग असतो तसा साधारण चौकोनी उघडा पिंजरा, त्यात छोटी गादी आणि त्यावर गुंडाळून ठेवलेली चार तान्ही मुले. मग आणखीही सामान होते. त्या मुलांना प्रवासात लागणारे दूध, पाणी, थोडी औषधे, बदलायचे कपडे, इतरही काहीबाही. त्या दोघीतली एक तरुण पारशी की इराणी मुलगी होती, दुसरी प्रौढ मराठी बाई. कपड्यांत गुंडाळून ठेवलेल्या त्या चार छोट्या अनपेक्षित प्रवाशांनी आजूबाजूच्या बहुतेक सर्व इतर प्रवाशांचे कुतूहल जागृत केले होते. तसा त्यांचा कुणाला… पुढे वाचा »