-
परमेश्वर दयाळू आहे आणि श्रेष्ठ उपकारकर्ता आहे, यात तिळमात्र शंका नाही. मानवजातीला त्याने मोठ्यांत मोठे असे काही दिले असेल, तर ती म्हणजे वाणी. आता बोलता आल्यावर माणूस ही कला आत्मसात करणारच. पूर्वी मनुष्यप्राण्याच्या वैभवकाळी वक्तृत्वकला ही तत्त्वज्ञ, कवी, नट आणि शास्त्रज्ञ यांच्यापुरतीच मर्यादित होती. पण पुढे मनुष्यजातीचा ऱ्हास होऊ लागला आणि वक्तृत्वकला ही भाषण करणे, या दशेप्रत येऊन पोहोचली. त्यातच अनेक राष्ट्रांच्या घटनांनी भाषणस्वातंत्र्याचा उद्घोष केला आणि 'भाषण देणे' हा प्रत्येक माणूसप्राण्याचा हक्क ठरला. जेवणाच्या टेबलापासून कोपऱ्यावरच्या सभेपर्यंत कोणीही उभे राहून भाषण करावे : बंधू-भगिनींनो!... आता तर लोक निवडून येण्यासाठी भाषणे करतात, का भाषणे करण्यासाठी निवडून येतात, असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो. बरे, ज्या कोणाला विनो… पुढे वाचा »
RamataramMarquee
आकलनाच्या कलाने...       हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ७. मिथ्यकथांची प्रतिबिंबे (उत्तरार्ध)       हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ६. मिथ्यकथांची प्रतिबिंबे (पूर्वार्ध)       हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ५. काही बिंदू आणि एक आलेख       हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ४. ट्रॉयचे युद्ध       हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: ३. पॅरिस आणि हेलन       हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: २. पूर्वरंग       हेलन ऑफ ट्रॉय – एक आकलन: १. आलेखाचा तिढा      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
बुधवार, १० जून, २०२६
भाषण देण्याचा प्रकार
Labels:
अनुभव,
पांढर्यावर काळे,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर
शुक्रवार, २९ मे, २०२६
... परतुनि ये घरा
-
प्रास्ताविक: ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकातील हे दोन प्रवेश कालिदासाच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या टप्प्यांभोवती रचलेले आहेत. ‘पाखरा जा, त्यजुनिया...’ या शीर्षकाच्या पहिल्या भागात प्रिय मल्लिकेला सोडून कालिदास कीर्ती, ऐश्वर्य, सत्ता यांच्या दिशेने चालला आहे. या भागात हे सारे गमावलेला कालिदास मल्लिकेकडे परतून आला आहे. दोन्ही भागांची शीर्षके मो. ग. रांगणेकर यांच्या ‘वहिनी’ या नाटकातील ‘पाखरा जा’ या पदातील अनुक्रमे पहिली नि अखेरची ओळ आहे. --- (परत वीज कोसळते, मेघगर्जना होते, देवडीकडील दार हळू हळू उघडते. दारात कालिदास उभा. खचलेला मोडलेला. मल्लिका एकदम उभी राहून तिकडे पाहू लागते. बाबरलेली. गोंधळलेली, तो पुढे येतो. मल्लिका अवाक् होऊन त्याच्याकडे पाहात राहाते.) कालिदास : बहुधा ओळखलं नसावंस. (मल्… पुढे वाचा »
Labels:
आषाढातील एक दिवस,
नाटक,
पुस्तक,
मोहन राकेश,
विश्वनाथ राजपाठक
शुक्रवार, २२ मे, २०२६
शुभास्ते पंथान: सन्तु
-
बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईला जात होतो. पहिल्या वर्गाचा तो डबा नेहमीप्रमाणेच भरलेला होता. आमच्या पुढच्याच दोन जागांवर दोन बाया येऊन बसल्या. त्यांच्या जवळच्या सामानात एक जरा वेगळीच चीज होती. पाळण्याचा मुलांना निजवायचा मधला भाग असतो तसा साधारण चौकोनी उघडा पिंजरा, त्यात छोटी गादी आणि त्यावर गुंडाळून ठेवलेली चार तान्ही मुले. मग आणखीही सामान होते. त्या मुलांना प्रवासात लागणारे दूध, पाणी, थोडी औषधे, बदलायचे कपडे, इतरही काहीबाही. त्या दोघीतली एक तरुण पारशी की इराणी मुलगी होती, दुसरी प्रौढ मराठी बाई. कपड्यांत गुंडाळून ठेवलेल्या त्या चार छोट्या अनपेक्षित प्रवाशांनी आजूबाजूच्या बहुतेक सर्व इतर प्रवाशांचे कुतूहल जागृत केले होते. तसा त्यांचा कुणाला… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)


