-
रावणाने डोळ्यांवर हात ठेवत सूर्याकडे नजर केली. आणि तो हसला. ‘काय झालं हसायला?’ कुंभकर्णाने विचारलं.. रावण आणि कुंभकर्ण सीतेच्या कुटीबाहेरच्या पडवीत उभे होते. तिची वाट बघत. त्यांनी नुकतीच न्याहारी केली होती. न्याहारी करून झाल्यावर पूजेसाठी सीता पुन्हा आता कुटीत गेली होती.. ‘असंच... दुःखात बुडालेला सूर्य पाहतोय,’ रावण उत्तरला. कुंभकर्ण खट्याळ हसत म्हणाला. ‘मला कळत नाही दादा, की कुठला तू जास्त त्रासदायक आहेस माझ्यासाठी. पूर्वीचा तू, जो माझं कधीच ऐकायचा नाही की आताच हा नवीन तत्त्वज्ञानी तू, जो कोड्यात बोलतो !’. रावण कुंभकर्णाच्या पोटात एक गुद्दा देत म्हणाला.‘अरे हलकट कुत्र्या!’ कुंभकर्ण रावणाला घट्ट मिठी मारत आणखी मोठ्याने हसू लागला. डोळ्यांतून पाणी येईपर्यंत एकमेकांना घट्ट मिठी मारत ते दोघे हसत राहिले. आणि मग त्यांच्या डोळ्यां… पुढे वाचा »
RamataramMarquee
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
शुक्रवार, १८ जुलै, २०२५
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज
Labels:
अन्योक्ती वाडेकर,
अमीश त्रिपाठी,
पुस्तक,
लंकेचा संग्राम
सोमवार, २६ मे, २०२५
उघडीप... आणि झाकोळ
-
मघाचा पाऊस सारखा कोसळत होता. सूर्य दिसत नव्हता, ऊन पडत नव्हते. गडद भरून आलेले आभाळ सारखे सांडत होते. जंगलातील झाडांची खोडे शेवाळ्याने हिरवीगार झाली होती. ओढे-नाले खळाळत होते. जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले होते. कधीमधी जोरात पडणारा पाऊस दमगीर होऊन हळूहळू येऊ लागे. थेंबांचा आकार लहान होई. सतत चाललेला घोष मावळल्यासारखा वाटे आणि निळे- पांढरे धुके लोळत येई. दऱ्या भरून जात, झाडे दिसेनाशी होत. डोंगरांची उंच शिखरे झाकून जात. निळे-पांढरे धुके सर्वत्र पसरून जाई. वारा भरारे, धुके निघून जाई. ओलीचिंब होऊन ठिबकणारी झाडे, फोफावलेल्या रानवेली, नाना जातींची झुडपे, मातीचा तांबडा रंग घेऊन धावणारे ओहळ, सर्वत्र पसरलेली हिरवळ दिसू लागे. ती क्षणभर दिसते-न दिसते तोच पुन्हा सडासडा धारा येत. झाडांचे शेंडे वाकत. गवताची पाती जमिनीला टेकत. नकोसा वाटणारा घोष जमिनीपासून… पुढे वाचा »
शुक्रवार, १६ मे, २०२५
कसे रुजावे बियाणे...
-
माझ्यासारख्या सुखवस्तू माणसांच्या जगामध्ये अन्नाचे ताट कधीही रिकामे राहात नाही. लहानपणी सठीसहामाशी लाभणारे मनोरंजनाचे भाग्यही इंटरनेटच्या कृपेने खिडक्या-दारांना धक्के मारत स्वत:हून घरात घुसते. ‘वेळ नाही’ किंवा ‘बिझी आहे’ अशी कारणे तुम्ही सांगू नयेत म्हणून, तुमच्या सोयीसाठी, दहा ते तीस सेकंदात तुमचे मनोरंजन करण्याची हमी ते देते. पाच/दहा रुपयांची चिप्सची पाकिटे विकावीत तशी मीम्स, रील्स वगैरे आणून तुमच्या मोबाईलवर वा संगणकावर ओतत असते. काही महिन्यांपूर्वी हे एक मीम फेसबुकवरुन माझ्यापर्यंत पोहोचले. हे मीम पाहून आलेलं हसू, ते ज्या प्रसंगावर बेतलेले आहे तो चित्रपट नि तो प्रसंग आठवला, नि क्षणात गोठून गेलं. मीममध्ये पार्श्वभूमी म्हणून वापरलेला हा प्रसंग ‘ सेव्हिंग प्रायव्हेट रायन ’ चित्रपटातील एका … पुढे वाचा »
Labels:
चित्रपट,
दृक्-श्राव्य,
युद्ध,
राजकारण,
समाज
बुधवार, ७ मे, २०२५
तो एक मित्र
-
तो माझा मित्र वयाने माझ्यापेक्षा थोडा मोठा होता आणि व्यवसायाने वकील होता. तो बरीच वर्षे त्या व्यवसायात असल्यामुळे त्याचा जम देखील बरा बसला होता. पण कोर्टातील दिवस संपल्यावर आपल्या कागदपत्रांची जुनाट, पोटफुगी बॅग इतक्या आनंदाने बाजूला फेकणारा दुसरा वकील मी पाहिला नाही. घरी आल्यावर दोन कप कडक चहा घेऊन खिडकीपाशी उभे राहून एक सिगरेट ओढून झाली की तो खरा जिवंत होत असे. मग पाच-सात जुनी इंग्रजी मासिके टेबलावर पसरून पाय देखील टेबलावर चढवून बसला की त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागे. याचे एक कारण म्हणजे त्याचा व्यवसाय जरी भडवा असला (हा त्याचाच शब्द) तरी मनाने मात्र तो एक हावरा वाचक होता. म्हणजे नेमून दिलेली अथवा कुणी तरी ऐसपैस गौरवलेली पुस्तके दडपणाने वाचून त्यावर चिकट समाधान मानणाऱ्यांपैकी तो होता असे नव्हे. त्याची शिक्षणाची कारकीर्द तर ऐषआरामात… पुढे वाचा »
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
परिचय
-
“आपल्या आजच्या व्याख्यात्या श्री...... ह्यांच्या कन्या आहेत—” माझी ओळख करून देणाऱ्या बाईंच्या बोलण्याला सुरुवात झाली. त्यांचे बोलणे मी अर्धवट ऐकत होते; पण मन मात्र बाईच्या बोलण्याने जाग्या झालेल्या स्मृती आणि कल्पना ह्यांत गुंतले होते. “एकदा लग्न उरकून टाकले म्हणजे जबाबदारी सुटली” असे बाबांचे बोलणे मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासून ऐकले होते. माझा पुढे शिकण्याचा हट्ट, बाबांचा त्रागा, शेवटी “कर, काय वाटेल ते कर” ह्या शब्दांनी मोठ्या कष्टाने दिलेली परवानगी हे आठवले; व तीच भाषा, तेच भांडण आणि तोच शेवट दरवर्षी परीक्षेच्या शेवटी कसा व्हायचा हे आठवून क्षणभर हसू आले. ते रागात आले म्हणजे अस्सल प्राकृतात पाचपन्नास शिव्या हासडून बोलत. आम्ही जरा मोठी झाल्यावर तर रोज ह्या-नाही-त्या गोष्टीवरून वादविवाद व श… पुढे वाचा »
गुरुवार, २७ मार्च, २०२५
वेचताना... : उठाव
-
जी. ए. कुलकर्णी यांनी USIS साठी (आता American Library) कॉनरॅड रिक्टर या अमेरिकन लेखकाच्या पाच पुस्तकांचा अनुवाद केला होता. त्यांच्या नेहमीच्या पॉप्युलर प्रकाशनाऐवजी ‘परचुरे प्रकाशन मन्दिर’ कडून ही पुस्तके प्रकाशित झाली होती. रान (The Trees), शिवार (The Fields) व गाव (The Town) या तीन कादंबर्या मिळून एका कुटुंबाची, पर्यायाने एका वस्तीच्या स्थापना-विकासाची कथा सांगतात. ही The Awakening Land trilogy म्हणून ओळखली जाते. हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उदयकालावरचे रूपकच आहे. या खेरीज ‘स्वातंत्र्य आले घरा’ (The Free Man) आणि ‘रानातील प्रकाश’ (The Light in the Forest) या दोन छोटेखानी कादंबरिकाही या संक्रमणकाळाच्याच कहाण्या सांगतात. या पांचातील सर्वात अदखलपात्र– होय, अ-दखलपात्र – पुस्तक आहे ते ‘स्वातंत्र्य आले घरा’ ही कादंबरिका. मूळ कथानक अ… पुढे वाचा »
उठाव
-
ते थोडे चालले असतील नसतील, तोच त्यांच्या मागे जलद पावलांचा आवाज ऐकू आला. हेन्नरने मागे वळून पाहिले. चांदण्यांच्या प्रकाशात एका स्त्रीची आकृती आपल्याकडेच वेगाने येत असलेली हेन्नरला दिसली. तिने लांब झगा घालून डोक्यावरून झाकून घेतले होते. तिला एकटीलाच पाहून त्याला फार आश्चर्य वाटले. “मला भेटायचं आहे तुम्हाला, लेफ्टनंट,” तिने हलक्या आवाजात म्हटले, पण यूनीला पाहताच ती थबकली. “सार्जंट, तू छावणीत जा परत.” हेन्नरने यूनीला पाठवून दिले. मान हलवीत यूनी चालू लागला. “हल्ली ससेच उलट कुत्र्यांच्या मागे लागू लागले आहेत ! दिवसच बदलून गेले अगदी!” जाता जाता त्याने बोलभाषेत काढलेले उद्गार हेन्नरच्या कानांवर पडले. “मला ते सांगितल्यावाचून राहवेना, लेफ्टनंट,” यूनी गेल्यावर ती म्हणाली, “जर तुम्ही ब्रिटिशांविरुद्… पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
कॉनराड रिक्टर,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
स्वातंत्र्य आले घरा
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५
चुंबन-चिकित्सा
-
“तुला जर माझ्या मुक्याचा इतका तिटकारा वाटत असेल तर परत नाही हो घेणार ! दुसरी एखादी असती तर तुझ्याशी बोललीसुद्धा नसती. पण मला तुझ्या न् तुझ्या नवऱ्याबद्दल माया वाटते ना!” म्हातारी का संतापली मला समजेच ना. माझे लग्न व्हायच्या आधी माझा नवरा जर्मनीत असताना त्याने जोडलेल्या माणसांपैकी ती होती. तो तिला ‘आजी’ म्हणे, तिने त्याला जर्मन शिकविले. त्याला परदेशात तिचे घर म्हणजे एक आसराच होता. पुढे मी जर्मनीत गेल्यावर त्याची बायको म्हणून तिने एखाद्या आप्ताप्रमाणे माझे स्वागत केले. चार ठिकाणी हिंडून चांगल्या कुटुंबात मला बिर्हाड बघून दिले. बर्लिनच्या विश्वविद्यालयातील दोन-चार अध्यापकांना भेटून माझे नाव नोंदविले. मी जरी कितीही कामात असले तरी पंधरा दिवसांतून एका शनिवारी संध्याकाळी तिच्याकडे जावयाचे व जेवून प… पुढे वाचा »
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
पाखरा जा, त्यजुनिया...
-
प्रास्ताविक: रमतारामाच्या विश्रांतीस्थळी काल ‘परतुनि ये घरा...’ मालिकेतील एक भाग प्रसिद्ध केला. त्यात मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’ मधील कालिदासाच्या परतून येण्याच्या प्रसंगाच्या आधारे आकलन मांडले आहे. सुदैवाने या नाटकाचा मराठी अनुवाद माझ्याकडे आहे. त्यातून कालिदासाने मल्लिकेचा निरोप घेऊन कीर्ति-संपदेच्या वाटे चालू लागण्याचा आणि सारे भौतिक यश गमावून परतून येण्याचा असे दोन प्रसंग निवडून इथे देतो आहे. ‘परतुनि ये घरा...’ मध्ये केवळ त्या संगतीच्या संदर्भामध्ये कालिदासाचे मूल्यमापन तेवढे आले आहे. एकुण नाटकाबाबतचे, या वेच्यांबाबतचे विश्लेषण स्वतंत्रपणे ‘वेचताना...’ मालिकेमध्ये लवकरच मांडेन. --- (अंबिका डोळे मिटून काही क्षण स्थिर उभी. मग उदासपणे सर्वत्र पाहाते व खचून गेल्यासारखी पाटावर बसते. थाळ्यातील तांदूळ चोळता चोळता डोळे भरून येतात.… पुढे वाचा »
Labels:
आषाढातील एक दिवस,
नाटक,
पुस्तक,
मोहन राकेश,
विश्वनाथ राजपाठक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)