-
एके काळी आमच्या गावात पोराला एकदा बिगरीत नेऊन बसवले की ते पोर मॅट्रिक पास किंवा नापास होईपर्यंत आईबाप त्याच्याविषयी फारसा विचार करीत नसत. " कार्ट चितळे मास्तरांच्या हवाली केलं आहे. ते त्यांच्या हाती सुखरूप आहे." अशी ठाम समजूत असे. "एके काळी असे" असेच म्हणणे योग्य ठरेल. कारण आता गाव बदलले. वास्तविक गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक म्हणून गावकर्यांनी शाळा काढली. पण पाळण्यातले नाव सदानंद किंवा असेच काहीतरी असावे आणि व्यवहारात मुलाला बंडू किंवा बापू म्हणून ओळखले जावे तशी आमच्या शाळेची स्थिती आहे. तिला कोणी गोखले हायस्कूल म्हणत नाही. चितळे मास्तरांची शाळा हेच तिचे लौकिक नाव. वास्तविक चितळे मास्तर शाळेचे संस्थापक नव्हेत, किंवा शाळेच्या बोर्डारदेखील नाहीत. इतकेच काय, पण मी इंग्रजी तिसरीत असताना त्यांना दैववशात म्हणतात तसे प्रिन… पुढे वाचा »
RamataramMarquee
मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९
चितळे मास्तर
Labels:
पु. ल. देशपांडे,
पुस्तक,
वेचित,
व्यक्तिचित्रे,
व्यक्ती आणि वल्ली
घटत्या बेरजेचा सिद्धांत
-
नेपोलियनने एकदा रणांगणातला एक हिशेब सांगितला होता. फ्रेंच सेना घेऊन तो इजिप्तमध्ये गेला होता. तेथील अरबांच्या एका जमातीचे नाव ‘मामेलुक’ असे होते. हे लोक अंगापिंडाने कणखर व शरीराने धिप्पाड होते. फ्रेंच लोक त्या मानाने बारीक दिसत. तेव्हा या धिप्पाड लोकांशी लढताना फ्रेंचांचा धीर खचू नये म्हणून त्याने फ्रेंचांना मानवी गणिताचा हिशेब सांगितला. तो म्हणाला, एक फ्रेंच व एक मामेलुक यांचा सामना झाला तर मामेलुक निश्चित भारी आहे. शंभर फ्रेंच व शंभर मामेलुक असा सामना झाला तर बरोबरी होईल आणि दहा हजार फ्रेंच व एक लक्ष मामेलुक अशी लढाई झाली तर फ्रेंच मामेलुकांचा सपशेल पराभव करतील! याचा अर्थ असा की फ्रेंचांची संख्या वाढत जाते तसतसे त्यांचे बळ संख्येपेक्षा जास्त होत जाते आणि मामेलुकांची संख्या वाढू लागली की ते कमजोर होत जातात! हे मानवी गणित आहे; जड वस्तूंच्य… पुढे वाचा »
Labels:
निबंध,
पु. ग. सहस्रबुद्धे,
पुस्तक,
माझे चिंतन,
लेख,
वेचित
दोन बुटके
-
'द प्रिन्सेस' ही स्वत:ला मानवतावादी, निसर्गप्रेमी समजणाऱ्या पण प्रत्यक्षात अत्यंत स्वार्थी व व्यवहारी असणाऱ्या एका श्रीमंत जहागीरदारीणबाईची कथा आहे असे वरकरणी वाटते. माणसाची स्वत:विषयीची समज किती खोटी असू शकते आणि माणसाचे विचार व त्याची कृती यांत केवढी तफावत असू शकते याचे ही कथा उत्तम उदाहरण आहे. आपण फार दयाळू आहो, कनवाळू आहो, परमेश्वराने गरीबांची मदत करण्यासाठी आपली निवड केली आहे, असे प्रिन्सेसला प्रामाणिकपणे वाटते. दर दोनतीन महिन्यांनी ती चर्चच्या मठाला भेट देते. तेथे भेटवस्तू वाटते. ती येणार असे कळल्यापासून ती जाईपर्यंत चर्चचे सारेजण तिच्या तैनातीत असतात. तिला उत्तम जेवण दिले जाते. राहण्याची उत्तम सोय केली जाते. येथले पवित्र वातावरण, येथील शांतता, परमेश्वरी कृपेचे सान्निध्य हे आपल्या मनावर केवढे ठसलेले आहे हे ती वारंवार सांगत रा… पुढे वाचा »
Labels:
कवडसे पकडणारा कलावंत,
चरित्र,
पुस्तक,
विजय पाडळकर,
वेचित,
समीक्षा
सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९
सामना
-
कर्नल थॉमस पेरी जवळजवळ धावतच रॉजर गिलीलँडच्या खोलीत दार ठोठावायलाही त्याला उसंत नव्हती. आत आल्या आल्या तो ओरडला, "रॉजर..." रॉजरव्यवसायानं संख्याशास्त्रज्ञ होता. संगणकाच्या साहाय्यानं सोडवली जाणारी समीकरणं हे त्याच्या विशेष अभ्यासाचं क्षेत्र होतं. काही वर्षांपूर्वी सोडवण्यात आलेल्या, चार रंगांच्या नकाशाच्या कूटप्रश्नाची उकल करण्यात ज्या दोन-चार जणांचा वाटा होता, त्यात गिलीलंड होता. आज तो एकटाच बुद्धिबळाचा डाव लावून बसला होता. "ये टॉम. बैस. आपण ब्रिटिशांइतके शिष्टाचाराला महत्त्व देत नाही, ही गोष्ट चांगली आहे यात शंकाच नाही. पण दार न ठोठावता आत शिरणं म्हणजे जरा जास्तच झालं. आत्ता माझ्या खोलीत माझी मैत्रीण असती म्हणजे?" "छोडो यार. तुझी मैत्रीण राहिली तिकडे फिलाडेल्फ… पुढे वाचा »
Labels:
कथा,
पुस्तक,
वामनाचे चौथे पाऊल,
वेचित,
सुबोध जावडेकर
नातं
-
नैसर आता अधिक झपझप पावले टाकीत होता. आपल्या आणि नैसरमधे अधिक अंतर राहणार नाही याची दक्षता अनीशाची पावले घेत होती. नगर संपले आणि अनीशाने नैसर आणि आपल्यातले अंतर नष्ट केले. थोड्याच अंतरावर अंधुकसा प्रकाश. जवळ गेल्यावर झोपडी दिसली. नैसर झोपडीजवळ गेला आणि दरवाज्याला विचारावे त्याप्रमाणे विचारले, 'आत कोण आहे का? ' थोड्या वेळाने दरवाजा अर्धवट उघडला आणि आतून रस्त्याला विचारावे तसे उलट विचारले, 'कोण पाहिजे?' 'आम्ही वाक्प्रसकडून आलोय, आम्हाला नेमिताजला भेटायचंय' नैसरने वाक्प्रसचा उल्लेख करताच पटकन दरवाजा पूर्णपणे उघडला गेला आणि 'या, आत या.' दरवाज्यालाच शब्द फुटले. 'या झोपडीत नगरापासून दूर हा नेमिताज एकटाच का राहात असावा?' असा एक प्रश्न नैसर… पुढे वाचा »
रविवार, २० ऑक्टोबर, २०१९
प्रश्नसूक्तांचा यात्रिक
-
डॉन पाय ओढत उपदेशकाकडे आला व त्याच्यासमोर काही अंतरावर बसला, उपदेशकाचा चेहरा जुन्या मधाप्रमाणे होता. त्यावर दिसत असलेले स्मित डॉनला पाहताच जास्तच उमलले. "मी आपणस तसदी देत नाही ना !" डॉनने अवघडलेल्या संकोची आवाजात विचारले. ’बिलकूल नाही, उलट तुला जर माझ्याशी बोलण्यात आनंद वाटत असेल तर मला धन्य वाटेल. मी येथे चिंतनासाठीच आलो होतो, आणि माणूस समोर असता तर माझे चिंतन जास्तच सहज होते. सुदैवाने मला परमज्ञान प्राप्त साले आहे. त्यापैकी एक अंश जरी मला इतरांना देता आला तर मला बरेच वाटेल, " उपदेशक म्हणाला. डॉन थोडा वेळ स्तब्ध राहिला. सारे आयुष्य ज्यासाठी फेकून दिले ते सारे थोड्या शब्दात कसे सांगायचे हे त्याला समजेना, त्याने प्रयत्न करत न्हटले, " मी अगदी आडगावचा माणूस आहे. मला तलवार कध… पुढे वाचा »
Labels:
कथा,
जी. ए. कुलकर्णी,
पिंगळावेळ,
पुस्तक,
वेचित
देहसूक्त
-
...खाली गर्दी वाढल्याने होणारा आवाज त्याला अस्पष्टपणे ऐकू येऊ लागला व तो उठून खाली येण्यासाठी निघाला. काही अंतरावर सारा वेळ उभे असलेले सेवक तत्परतेने त्याच्या समोर निघाले. लाल गरुड खाली आला व त्याच्यासाठी अंथरलेल्या चादरीवर बसताना आपला बेडौलपणा इतरांच्या ध्यानात येणार नाही, अशा त-हेने अंग उतरवून तो प्रशस्तपणे बसला. जेथे खडकातील घरांचे थर सुरू होत होते, तेथे पायथ्याशी सपाट पटांगणावर वर्तुळाकार आग पेटवली होती, तिच्यापासून काही अंतरावर, सर्वांग काळे रंगवलेल्या आणि अस्वलांची केसाळ कातडी पायाभोषती गुंडाळलेल्या पुरुषांचे आणखी एक वर्तुळ तयार झाले होते. जाळाच्या वर्तुळाच्या मध्यभागी गवताच्या उशीवर आरशाचा एक तुकडा ठेवला होता. कोणत्याही पवित्र नृत्यात स्त्रियांना स्थान नव्हते, त्यामुळे त्या … पुढे वाचा »
Labels:
कथा,
काजळमाया,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
वेचित
शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९
नरोटीची उपासना
-
धर्मभ्रष्ट म्हणजे काय? पन्नास पाउणशे वर्षांपूर्वी इंग्रजी विद्येचा आपल्या देशात प्रसार होऊ लागला आणि त्यामुळे नवे आचारविचार सुरू झाले. त्यावेळी धर्म बुडाला, आता कलियुग आले, विनाशकाल जवळ आला असे उद्गार सर्वत्र सनातनी लोकांच्या तोंडून ऐकू येऊ लागले. घरोघरी आईबाप आपली मुले धर्मभ्रष्ट झाली - त्यावेळच्या भाषेत सुधारक झाली, असे म्हणू लागले होते. त्यावेळी मुले धर्मभ्रष्ट झाली म्हणजे काय झाले, असे जर त्यांना कोणी विचारले असते तर त्यांनी काय उत्तर दिले असते? विश्वनाथ नारायण मंडलिक, दादोबा पांडुरंग यांच्या चरित्रांत ही उत्तरे सापडतात. अमक्या दिवशी हजामत करणे निषिद्ध असताना ती केली, अमक्या वारी अमुक खायचे नसताना खाल्ले, घेर्याचा आकार कमी केला, एकादशीला बटाटे, रताळी हे खाण्याऐवजी मुळे, गवारी, गहू हे खाल्ले, अशा प्रकारच्या या तक्रारी होत्या. धर्म म… पुढे वाचा »
Labels:
निबंध,
पु. ग. सहस्रबुद्धे,
पुस्तक,
माझे चिंतन,
लेख,
वेचित
शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९
मलिका-ए-गझल
-
कॉलेजात पाऊल ठेवल्यावर कितीतरी वर्षांनी बेगम अख्तरचा आवाज अचानक ऐकायला आला तेव्हा ती नवी गझल एका बकाल वस्तीतल्या खरखरणाऱ्या रेडियोवर कानांत प्राण आणून ऐकली होती. स्तब्ध झालेल्या कोकिळेला पुन्हा कंठ फुटला होता. वसंत ऋतू पुन्हा बहरला होता. मग बेगम अख्तरचं गाणं रेडियोवर आणि रेकॉर्डवर पुष्कळ ऐकलं. पण प्रत्यक्ष तिची मैफल ऐकायला मिळाली ती कॉलेजजीवन संपून गेल्यावर चारपाच वर्षांनी. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं धनवटे रंगमंदिरात आयोजित केलेला कार्यक्रम होता तो. पडद्यावर पाहिलेली अख्तरी आणि समोर बसलेली पंचेचाळीस वर्षांची प्रौढा बेगम अख्तर यांच्यात जमीनअस्मानाचा फरक होता. तसं पाहिलं तर तिचा विशीतला अवखळ, चंचल आवाजही आता स्थिरावला होता. त्यात एकप्रकारची आकर्षक धीरगंभीरता आली होती. तिच्या तोंडून 'ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया' ही ओळ बाहेर पड… पुढे वाचा »
बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९
पातकांची परिमिती
-
“मला वाटले होते, एखादे अत्यंत सडलेले प्रेत आभाळात टांगून ठेवावे त्याप्रमाणे माझे पातक सगळ्यांना माहीत असेल. मी माझ्या पवित्र नेत्याचा घात केला. त्याच्या वस्त्राचे आदराने चुंबन घेत आहे असे दाखवून मी द्रोह केला आणि त्याला शत्रुसैनिकांच्या आधीन केले. शेवटी त्याला स्वतःचा अवजड क्रूस खांद्यावर घेऊन ओढत जात, त्याच क्रूसावर आपले आयुष्य अत्यंत वेदनेने संपवावे लागले. त्याचे पवित्र रक्तच माझ्या डोक्यावर थापले आहे. तू मला ओळखत नाहीस ? अरे, मी ज्यूडास आहे." समोर जमिनीतून एकदम एक विषारी सर्प उभा राहिल्याप्रमाणे डॉन दचकला आणि मागे सरला. क्षणभर त्याची वाचाच गेली व तो थिजलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. नंतर त्याने स्वतःला सावरले व म्हटले, " तू! पण तू ते का केलेस?" ज्यूडासने अविश्वासाने त्याच… पुढे वाचा »
Labels:
कथा,
जी. ए. कुलकर्णी,
पिंगळावेळ,
पुस्तक,
वेचित
मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९
तिढा
-
रात्री बाराच्या नंतर यशीत धुराळा उडाला. कर्कश्श आवाज करीत पोलिसांच्या गाड्या आल्या. कुत्री भुंकायला लागली. सगळा कल्लोळ मातला. भर्रर्र करीत गाड्या मारोतीच्या पाराजवळ थांबल्या. पुढच्या गाडीला पिवळा दिवा. ज्याला सुगावा लागला, त्यांनी आपली दारं अधिक गच्च केली. पोलिसांनी पटापटा उड्या मारल्या. फुंकलेल्या शिट्यांनी कुत्र्यांना अधिकच चेव आला. मारोतीच्या पुढे मन्मथ वाण्याचं घर. पोलिसांनी दारावर काठी आपटली. दार उघडण्याच्या तयारीत कोणीच दिसंना. आवाज आणखी वाढला. पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकला तरीही मन्मथनं धीट मन करून विचारलं. "कोणंय?" "दार उघड आधी, मग सांगतो.” आवाजात बेदरकारपणा, मन्मथनं दार उघडलं. नाव विचारल्यानंतर पोलीस म्हणाले, “अप्पा, जरा बाहेरच या तुम्ही.” मन्मथ बाहेर आला. पोलिसांनी… पुढे वाचा »
Labels:
आसाराम लोमटे,
इडा पीडा टळो,
कथा,
पुस्तक,
वेचित
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)